*श्री गजानन विजय ग्रंथाच्या* *प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्व*
*जय गजानन !*
*श्री गजानन विजय ग्रंथ* हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. *श्री गजाननाच्या* भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्य सोडवण्याचे सामर्थ्य *“श्रीगजाननविजय ग्रंथ”* वाचनामध्ये आहे.
संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे.
एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदातरी पारायण करा विजय ग्रंथाचे.
*श्रीगजाननविजय ग्रंथाचा* प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रोब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो.
*🕉अध्याय १*
निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यापुर्वी
*🕉अध्याय २*
कुटुंबातील व्यथा आणि अडचणी दुर व्हाव्यात म्हणुन
*🕉अध्याय ३*
दुसर्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तर,
कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर नक्की वाचावा
*🕉अध्याय ४*
जीवनातील दुख आणि समस्या कमी होण्यासाठी
*🕉अध्याय ५*
दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणि जवळ नसेल तर , गेलेली संपत्ती परत यावी म्हणुन, जीवनात सकारात्मक बदल व्हावे म्हणुन
*🕉अध्याय ६*
हा अध्याय वाचल्याने चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळेल
*🕉अध्याय ७*
हा अध्याय वाचल्याने निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल,
इच्छुकांना संतान प्राप्ती होईल
*🕉अध्याय ८*
हा अध्याय वाचा
कायदे विषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेस मध्ये विजय मिळेल,
अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल.
*🕉अध्याय ९*
हा अध्याय वाचा
हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल
शत्रूंचा नाश होईल,
चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल, महाराजांचे कुठ्ल्या तरी स्वरुपात किंवा स्वप्नात दर्शन होईल ( जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल )
*🕉अध्याय १०*
आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती/ प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी हा अध्याय नक्की वाचावा
*🕉अध्याय ११*
ध्येयप्राप्ती व्हावी आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठी,
स्वरक्षण होण्यासाठी,
अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी
ह्या अध्यायाचे वाचन करावे
*🕉अध्याय १२*
आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीत चांगले उत्पादन, जास्त धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी हा अध्याय नक्की वाचा
*🕉अध्याय १३*
कर्करोग अथवा तत्सम दुर्धर रोगांपासून मुक्तीसाठी,
महापूर, वादळ, अग्नी इत्यादि नैसर्गिक आपत्ती/ संकटापासून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी
अध्याय १३ वाचावा
🕉अध्याय १४
अचानक सांपत्तिक / आर्थिक हानी झाली असल्यास, अनभिग्न संकटांपासून रक्षणा साठी,
नदी/ तलाव, पाण्याच्या धोक्यापासून बचाव होण्यासाठी
हा अध्याय वाचावा
*🕉अध्याय १५*
आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी
काम, क्रोध, मद, मत्सर, राग, लोभादि षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी
नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी
हा अध्याय नक्की वाचावा
*🕉अध्याय १६*
खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अति
तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यातुन मुक्तीसाठी
हा अध्याय वाचावा
*🕉अध्याय १७*
खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता व्हावी म्हणुन
दुसर्याकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती व्हावी म्हणुन हा अध्याय वाचावा
*🕉अध्याय १८*
महाराजांचा तिर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील
इष्ट देवतेचे दर्शन होईल
साथीच्या रोगापासुन मबाराज आपला व आपल्या परिवाराचा बचाव करतिल
*🕉अध्याय १९*
ह्या अध्यायाच्या वाचनाने विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल
स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणार्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल
*🕉अध्याय २०*
ह्या अध्यायाच्या वाचनाने विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल
*🕉अध्याय २१*
मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी हा अध्याय वाचा आणि प्रचीती घ्या.
आरोग्यपुर्ण, सुखी, समृध्द, आनंदी जिवन हवे असेल तर शक्य होईल तेंव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचे एकआसनी पारायण करावे.
वेळेअभावी पुर्ण पारायण शक्य होत नसेल तर गुरुवारचे पारायण ह्या उपक्रमात अवश्य भाग घ्यावा.