शिक्षक भरती निघाली म्हणं,
पोरं झाली खुशाल,
पवित्र पोर्टलवर प्राधान्य भरता-भरता,
गेलं मोबाईलचं हाल!
जिल्हा टाकला, तालुका टाकला,
शाळा बघून घेतली पसंत,
“यंदा आपलं लागंल बघ!”
म्हणत बसलो दिवसभर शांत!
सकाळ झाली की पोर्टल उघडं,
रात झाली तरी तेच काम,
आई म्हणं—“जेवायला ये रे!”
मी म्हणं—“थांब गं, अपडेट आलं का बघतो आधी!”
कुणी म्हणं आज यादी लागंल,
कुणी म्हणं उद्याच येणार,
उमेदवार बिचारा रोजच,
मोबाईल घेऊन बसणार!
कधी सर्व्हर डाउन पडं,
कधी पोर्टलच रुसून बसं,
आपलं नशीब कधी उजाडं,
याचीच वाट सगळा जग बघं!
माजी सैनिक, अंशकालीन,
आरक्षणाची वेगळीच गोष्ट,
जागा किती अन् कोणाला मिळंल,
हिशोब करताना फुटं माथं!
दुसरा राऊंड कधी लागंल,
रिकाम्या जागा किती उरल्या?
“माझं नाव येणार का रं?”
म्हणत आशेच्या वाटा धरल्या!
पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
हिम्मत सोडायची नाय,
एवढं दिवस वाट पाहिली,
आता मागं फिरायचं नाय!
आज नाय तर उद्या बघा,
आपली पाळी येणार,
ज्या दिवशी नियुक्तीपत्र हातात येईन,
त्या दिवशी सगळा थकवा पळून जाणार!
म्हणून धीर धरा रं भावांनो,
आशा मनात ठेवा भारी,
शिक्षक होण्याचं स्वप्न हाय आपलं,
आन् हीच आपली खरी लढाई!
By AGS








