निवडणूक आली की
रस्त्यावर, चौकात
झेंडे उगवतात
आणि त्याखाली
हमरामखोर औलादी
टोळक्याने फिरतात
कालपर्यंत
पोटासाठी धावणारे,
आज
साहेबांच्या नावानं
छाती काढून माज मिरवतात
अरे औलादीनो,
तुमचं दुःख तरी
कधी तुमचंच होतं का?
विकास म्हणे…
कुठंय तो विकास?
शाळा पडकी,
दवाखाना बंद,
आईबाप कर्जात बुडाले,
ना हाताला काम, ना धंदा
आणि तुम्ही
साहेबांच्या गाड्यांसमोर
हात जोडून उभे
लाचारासारखे
हे कार्यकर्ते नाहीत रे,
हे पैशासाठी स्वाभिमान
चिखलात फेकणारी
औलादी आहेत
दिवसा
“बाबासाहेब, बाबासाहेब”
असं बोंबलतात,
आणि रात्री
त्याच बाबासाहेबांचं
संविधान
दारूच्या नशेत
चिखलात लोळवतात
लाज तरी आहे का रे?
अरे नीट ऐका
बाबासाहेबांनी
झेंडे नाही दिले,
त्यांनी डोकं उघडायला
विचार दिला
पण तुम्ही
तो विचार
निवडणुकीच्या दिवशी
फेकून दिलात,
आणि म्हणता
“साहेब मोठे आहेत”
मोठे नाहीत रे,
ते तुमच्या अज्ञानावर
राज करणारे
लुटारू आहेत
झेंडा हातात घेतला
म्हणजे
कणा आपोआप येत नाही,
कणा येतो
प्रश्न विचारल्यावर,
डोळ्यात डोळे घालून
सत्तेला जाब दिल्यावर
ही निवडणूक नाही रे,
ही बहुजनांच्या बुद्धीवरची
नाकेबंदी आहे
जिथे
मतदानाआधीच
पैसे देऊन
विचार मारला जातो
आणि शेवटचं सांगतो
कान उघडे ठेवून ऐका
आंबेडकरी चळवळ
भिक मागायला शिकवत नाही,
ती
हक्क मागते,
अन्यायाला वाचा फोडते,
प्रश्न विचारते
आणि
वेळ आली तर
भिडते ✊
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#विद्रोह #आंबेडकरीविचार #बहुजनआवाज #संविधान #लोकशाही
#बाबासाहेब #शिका_संघटित_व्हा_संघर्ष_करा #निवडणूक #राजकारण
#विचारांचा_संघर्ष #ग्रामीण_सत्य #खोटा_विकास #गुलामगिरी
#जनतेचा_आवाज #MarathiPoetry #MarathiReels #PoliticalPoetry
#RebelPoetry #UndergroundPoetry #VoiceOfPeople
#IndianPolitics #Vinayakbhise #महाराष्ट्र #बारामती #बहुजन