प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकच मागणी…
एक शिक्षक आणि जबाबदार नागरिक म्हणून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या गंभीर आरोपांमुळे मनापासून दुःख होते. रात्रंदिवस मेहनत करणारे विद्यार्थी आपला वेळ, पैसा, मेहनत आणि भविष्य या व्यवस्थेवर विश्वास ठेवून पणाला लावतात. काहींच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, हीच अपेक्षा.
आमची मागणी कोणाविरुद्ध नसून सत्य, न्याय, पारदर्शकता आणि विश्वासासाठी आहे.
प्रमुख मागण्या :
👉 प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी.
👉 दोष सिद्ध झालेल्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
👉 आयोगाच्या परीक्षाव्यवस्थेत तातडीने रचनात्मक व संस्थात्मक सुधारणा कराव्यात.
👉 प्रश्नपत्रिकेच्या संपूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था व जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा निर्माण करावी.
👉 महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अनुभवी वरिष्ठ प्रशासकीय IAS दर्जाची व्यक्ती सहभाग सुनिश्चित करावा.
ही केवळ परीक्षा नाही; ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची मेहनत, स्वप्नं आणि भविष्य आहे.
प्रामाणिक मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे!
# ध्यास प्रबोधिनी
आपलाच,
प्रेमराज चव्हाण
@PremrajChavan
24
1August 29, 2026 2.9K