“आयुष्य”वारीत “वारकरी”होता यावं..
आषाढ सुरु झाला की शेतीची कामं आवरुन त्यांची एकच लगबग सुरु होते
संसार ,शेती ,नातीगोती सर्व पांडुरंगाच्या भरोश्यावर सोडून पाऊल पंढरीची वाट धरतात
आजच्या स्पर्धेच्या काळातही आयुष्यातील दरवर्षी १५-२० दिवस पायपीट करत एक क्षणाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी यांच्यात भक्तीचा भाव पाहून नतमस्तक व्हायला होतं..
देवाचिया दारी उभा क्षणभरी” असं म्हणत त्या पांडुरंगासमोर निव्वळ एक दोन सेकंद उभं राहायला मिळतं असतं कधीकधी तर तेही नाही तरीही मागचे १०-१५ दिवस पायवारी अन् २०-२२ तासाच्या रांगेत उभं राहायला वारकरी व्हावं लागतं ..
प्रॅक्टिकल हिशोबी माणसाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी वेडच असावे लागते देवाच्या भेटीचे..
वर्षानुवर्षे अशी परंपरा जपण्यासाठी,बहाणे न देण्यासाठी ,शिवाय कसल्याच लक्झरीची अपेक्षा न बाळगता फक्त रामकृष्ण हरी म्हणत पांडुरंगाच्या भेटीची ओढ असायला वारकरीच व्हावे लागतं..
वर्षाभरातून वारीचे दिवस म्हणजे संसार प्रपंचातून ब्रेक घेत विठ्ठलासोबत अंतर्मुख व्हायला वारकरीच व्हावं लागतं ..
नास्तिकांच्या सिध्दांताना भेदून असा नामाचा गजर अन् भक्तीचा माहोल लाखोंच्या गर्दीत अनुभवायला वारकरीच व्हावं लागतं ..
जगण्याची सगळी गाऱ्हाणी त्यांच्याकडे मांडून नव्या उर्जेने घराकडे परतत नव्या उमेदीने आयुष्याला भिडण्यासाठी वारकरी व्हावं लागतं 🚩🚩
सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या सर्व aspirant वारकऱ्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे पांडुरंगा🚩
143
3July 25, 2026 13.5K 16