संपूर्ण उन्हाळा हे झाड झाड वाटतं नव्हतं
नुसतचं वाळलेली काडी आपण पोसतोय असं वाटायचं याला पाणी घालतांना
कित्येक वेळा याला काढून इथे दुसरं काही लावू असं मी म्हणायची
त्यावर आमचे साहेब म्हणायचे,” राहू दे गं,वाट पाहू ,तुला काय त्रास आहे का त्याचा.?“
ज्याच्या जगण्याची आणि बहरण्याची मला तरी शक्यता जवळजवळ शून्य वाटत होती कारण बागेतील इतर २०-२५ झाडं स्वतःच किमान अस्तित्व दाखवणारी काहीतरी लक्षणं दाखवत होती परंतु हे पूर्ण रुक्ष ,निष्पर्ण वाळलेलं झाडं नुसतंच वाळलेली काडी मातीत अडकावी असं दिसत होतं
आणि तब्बल ६ महिन्यांनी ,पावसाच्या आगमनाने म्हणा वा नवऱ्याच्या इच्छाशक्तीने किंवा त्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीने गेल्या आठवड्यापासून असं खाली मुळापासून फुटतांना दिसतयं..
शेवटच्या घटका मोजणार्या, आयसीयु मध्ये निपचित पडलेल्या पेशंटने हात पाय हालवावे अन् आशा पल्लवित व्हाव्यात असं या झाडांचं स्थित्यतंर मनाला संयमाची शिकवण देऊन गेलं .
माणसाच्या आयुष्याचही काही अंशी असचं असतं
ज्यांच्याकडून कुणी अपेक्षा करत नाही अशी माणसंही आयुष्याच्या रंगमंचावर कमाल खेळी खेळून जातात कारण त्यांचा विश्वास असतो स्वतःच्या मुळांवर ,वेळेवर आणि संयमावर ..
जगण्याची आणि जिंकण्याची उर्मी गोष्टी घडवून आणते 🌿✨
258
15
7July 12, 2026 16.5K 66