भारताच्या संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली?
उत्तर: ४२ वी घटनादुरुस्ती
महाराष्ट्रातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कोण होता?
उत्तर: वि. स. खांडेकर
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
उत्तर: वुलर सरोवर
‘गीतांजली’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
उत्तर: कोयना धरण
भारतीय राज्यघटनेचा कलम ३२ कशाशी संबंधित आहे?
उत्तर: घटनात्मक उपायांचा अधिकार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: १८८५
भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
उत्तर: १९५१
महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सातारा
‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: समर्थ रामदास
पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे?
उत्तर: नायट्रोजन
हरितक्रांतीचे जनक म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?
उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन
भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: गंगा
‘Discovery of India’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: जवाहरलाल नेहरू
भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. सच्चिदानंद सिन्हा
लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले?
उत्तर: उल्कापातामुळे
महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते?
उत्तर: मुंबई विद्यापीठ
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर: १९३५
‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?
उत्तर: लालबहादूर शास्त्री
भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या?
उत्तर: प्रतिभा पाटील
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/fktvardi
