व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये… — CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 — TG.ME

व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!

या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.

ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.

त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.

या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.

महत्त्वाचे:

जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.

ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
👍5❤2
September 8, 2026 2.3K