अनेक आश्रम शाळा या दुर्गम ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य स्त्रोत… — Civil Info © — TG.ME

अनेक आश्रम शाळा या दुर्गम ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु या खाजगी तसेच शासकीय आश्रम शाळा याचा वापर सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून काही संस्थाचालक वापर करतात . सरकार द्वारे लाखोंचे अनुदान तर राजकीय लोकांचे हस्तक यांना कंत्राट दिले जातात. मुळात या आश्रम शाळा बंद करून काय साध्य होणार?

त्या ऐवजी सुधारणा करणे अपेक्षित आहे. दोषींना शिक्षा द्या पण ग्रामीण भागातील शिक्षणाचा पर्याय दुसरा उपलब्ध आहे का याची चाचपणी होणे आवश्यक आहे.

अनेकदा मुलीवर आश्रम शाळेत अत्याचार झाल्याचे बातम्या येतात.
मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे.

या वर उपाय म्हणजे महिला पोलिस याचे वेळोवेळी तेथे भेट देणे , सरकार कडून तपासणी , पत्रकार यांच्या भेटी आवश्यक आहे.
👍48❤21
August 12, 2026 15.4K 4