जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतातील पहिले 100% थेट नियंत्रण असलेले प्रमुख बंदर बनले आहे जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता 1.5 दशलक्ष TEUs (वीस-फूट समतुल्य युनिट्स) वरून 1.8 दशलक्ष TEUs होईल सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) च्या माध्यमातून सर्व प्रमुख बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या मालाची टक्केवारी 2030 पर्यंत 85% करण्याचे उद्दिष्ट आहे जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातले अग्रगण्य कंटेनर बंदर असून जागतिक पातळीवरील अव्वल 100 बंदरांमध्ये या बंदराचा 26वा क्रमांक आहे. (लॉयड्स लिस्ट टॉप 100 पोर्ट्स 2021 अहवालानुसार). जवाहरलाल नेहरू बंदर सध्या 9000 TEUs क्षमतेच्या जहाजांची हाताळणी करत असून त्यात श्रेणीवाढ झाल्यानंतर त्याची क्षमता 12200 TEUs इतकी होईल. याशिवाय या बंदरातील रेल माउंटेड क्वे क्रेन RMQC रेल्वेची क्षमता 20 मीटर वरून 30.5 मीटर करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी सवलत प्राधिकरण 872 कोटी रुपये इतकी एकूण गुंतवणूक करणार आहे. या टर्मिनलचे आधुनिकीकरण, कार्यान्वयन, देखरेख आणि हस्तांतरण यासाठी सवलत प्राधिकरणाला पीपीपी तत्त्वाचा अवलंब करावा लागेल. हा प्रकल्प 2 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. ●●●◆◆Follow us @MpscPDF◆◆●●●
MཽpscPDFཽ: post #3737 — TG.ME
July 21, 2022 7.5K